(फाल्गुन शु.14)(दि.20 मार्च 2019)
वैज्ञानिकदृष्टया महत्व : उन्हाळाही सुरू होत असतो,जमीन भाजून निघते. तिच्यातूनउष्ण वाफारे निघतात. घराभोवतीपानांची कुजलेली घाण तशीचअसेल तर ती आरोग्यालाहानीकारक असते, म्हणून तिचीहोळी करणे आवश्यक आहे.
स्वच्छता ही एकदा करून भागत नाही, पुन्हा पुन्हाकरावी लागते, त्याची आठवण करून देणारा सणम्हणजे होळी. होळी म्हणजे उष्णता देणार्या अग्नीलाकृतज्ञतापुर्वक केलेला प्रणाम. होळी म्हणजे ऋतुराजवसंताचे आगमन.हा सण कसा साजरा करतात?या दिवशी अंगणातील थोडी जागा सारवूनत्याभोवती रांगोळी काढून मधोमध शेणाच्या गोवर्या,त्यात एरंडाची फांदी ठेवतात. एरंडाचा एक दांडाउभा करतात. त्याच्याभोवती लाकडे गोवर्यारचतात. त्याची पूजा करावी. पुरण पोळीचा नैवेद्यदाखवावा. खेडेगावात सगळे गाव मिळून गोवर्यालाकडे गोळा करून सावर्जनिक ठिकाणी होळीकरतात. तिची पूजा करतात, नंतर त्यात नारळअर्पण करतात. खोबर्याच्या वाट्या भाजून प्रसादवाटतात. प्रत्येक सेवेकर्याने आपल्या घरासमोरीलमोकळ्या जागेत छोटी होळी पेटवावी. नंतर हातातपाणी घेऊन “मी व माझे कुटुंब यांना सुखशांतीमिळावी म्हणून होळीचे पूजन करतो” असा संकल्पकरावा. त्यानंतर घरातील विस्तवाने होळी पेटवावी.त्याची पंचोपचार पूजा करावी व नैवेद्य द्यावा.
असृक्पाभयसंत्रस्तै: कृत्वा त्वं होलि बाहलशै:।
अतस्त्वा पूजयिष्यामि भूते भूतिप्रदा भव॥
असा मंत्र म्हणून तीन प्रदक्षिणा घालाव्यात. खोबर्याचीवाटी किंवा नारळ भाजून त्याचा प्रसाद घ्यावा. तसेचघरात त्रास देणार्या जीव किटकांच्या (झुरळे, डास,ढेकूण वगैरे) कणकेच्या आकृत्या करून त्या होळीतटाकाव्यात म्हणजे ते जीवाणू नष्ट होतात. होळी यासणाच्या निमित्याने मनुष्याने आपल्या अंगी असलेलेवैगुण्य, दोष, प्रवृत्ती यांची होळी करावी. संपूर्णवर्षाच्या शेवटी या सर्व गोष्टी सोडून द्याव्यात. हाचया सणाचा उद्देश.